नमस्कार गडकरी साहेब, आपण नुकतेच बोलला होतात कि अमिरिकेत सोयाबीनचा एकरी ३० क्विंटलचा उतार असून त्यामानाने आपल्या देशात सोयाबीन चे उत्पादन १० ते १४ क्विंटल पर्यंत आहे. आपल्या विधानाने संपूर्ण देशासहित मीडिया चे लक्ष या निमित्ताने का होयना शेतकर्त्यांकडे गेले आहे.
त्या निम्मीतनाने मी काहि गोष्टी आपल्या समोर आणू पाहत आहे तुम्ही यात नक्की लक्ष घालाल हि अपेक्षा करतो , अमेरिकेत GM पिकांना परवानगी देण्यात आली आहे भारतात मात्र सरकार कडून बाद झालेले हायब्रीड बियाण लागवड करण्याची सक्ती करण्यात येते जगात आपल्या पेक्षा प्रगत तंत्रज्ञान वापरून शेती केली जाते आपल्या देशात शेतकऱ्यांवर अनेक प्रकारची बंधने लादली जातात भारतीय शेतकरी जगा बरोबर स्पर्धा कशी करू शकतो इतकी बंधने असताना ?
निदान तुम्ही सरकार मध्ये सर्वोच्च स्थानी आहेत तुम्ही तरी भारतीय शेतकऱ्यांना प्रगत GM तंत्रज्ञान मिळावे म्हणून सरकार दरबारी प्रयत्न केले पाहिजेत निश्चितच भारतीय शेतकरी देशाचे परकीय चलन वाचवू शकतो जे तुमचे सरकार परदेशातून आयात करण्यासाठी खर्च करत आहेत भारतीय शेतकरी देशाला डाळी , कडधान्ये , तेलबिया , खाद्यतेल, या मध्ये स्वयंपूर्ण बनवू शकतो आम्हाला गरज आहे प्रगत GM तंत्रज्ञान उपलब्ध होण्याची पण आपले सरकार एकीकडे अमेरिकेची बरोबरी करायला सांगते आणि दुसरी कडे आपले पंतप्रधान नैसर्गिक शेती ची भालामन करून भारतीय शेतकऱ्यांना अश्मयुगीन शेती चे धडे देत आहेत कशी काय होणार जगाबरोबर स्पर्धा ?
अमेरिका काय आपले शेजारी देश पाकिस्तान , बांगलादेश हे आता GM तंत्रज्ञान वापरून शेती मध्ये प्रचंड प्रमाणात आगेकूच करीत आहेत पाकिस्तान मध्ये कापूस पिकात जगाचे पुढचे तंत्रज्ञान सरकार कडून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे तिथं तब्बल दहा GENE जनुक असलेले कापसाचे सरळ वान तंत्रज्ञान वापरून एकरी सरासरी तीस क्विंटल पर्यंत उत्पादन काढत आहेत तेथील शेतकरी अमेरिका सोडा आपण पाकिस्तान , बांगलादेश पेक्षा वीस वर्ष मागे आहेत तेही सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे .
अमेरिकेत जीएम सोयाबीन बियाणे (जेनेटिकली मॉडीफाईड ) वापरले जातात तर आपल्या देशात नॉन जीएम सोयाबीन बियाणे वापरले जात आहेत. त्या मुळे त्याचा अपसूक सोयाबीनच्या उत्पदनावर परिणाम होत असून अमेरिकेत एकरी ३० क्विंटल तर भारतात १० ते १४ क्विंटल च्या दरम्यान होत आहे. देशातील कृषी विद्यापिठ जीएम पिकांसाठी आग्रही आहेत तरी पण देशी वानाच्या नावाखाली शेतकऱयांची पिळवणूक आणि लूट होत आहे. गडकरी यांचे विधान त्यामुले नक्कीच अर्थपूर्ण वाटत नाही. सोयाबीन ची जशी स्टोरी आहे तशीच कथा कापूस , वांगी आणि टोमॅटोची.
आपल्या देशाला जीएम सोयापेंड चालते, जीएम सोयातेल चालते पण शेतकऱयांनी देशात जीएम पिके घ्यायची नाहीत हा सरकारचा, राज्यकर्त्याचा आणि समाजाचा शेतकऱ्याविषयी दुट्टपीपणा आहे. यातून शेतकऱयांचा खर्च वारेमाप वाढत आहेत तर उत्पादन कमी होत आहे. तुमच्या विधानानाने हा प्रश्न केंद्र सरकारच्या एरणी वर येईल हि अपेक्षा सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच आहे.
शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठ आणि तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे !!